मुंबई : मेट्रो स्थानकातून (Mumbai Metro) बाहेर पडणे आणि इच्छित स्थळी वा रेल्वे स्थानक, बेस्ट स्थानक, रिक्षा-टॅक्सी थांब्यापर्यंत जाणे प्रवाशांना सोपे व्हावे यासाठी अनेक मेट्रो स्थानके पादचारीपुलाशी जोडली जात आहेत. त्यानुसार आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘वडाळा – घाटकोपर – ठाणे – कासारवडवली – गायमख मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकेवरील चार मेट्रो स्थानके पादचारीपुलाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विक्रोळी, पंतनगर, भांडूप आणि विजय गार्डनर ही चार मेट्रो स्थानके पादचारीपुलाने जोडण्यासाठी एमएमआरडीएने (MMRDA) निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
या निविदेनुसार १२९ कोटी रुपये खर्च करून काम सुरू झाल्यापासून १५ महिन्यांच्या कालावधीत पादचारीपुलांची कामे पूर्ण केली जाणार आहेत. हे पादचारीपूल तयार झाल्यास विक्रोळी, पंतनगर, भांडूप आणि विजय गार्डन मेट्रो स्थानकातून बाहेर पडणे आणि इच्छित स्थळी पोहचणे सोपे होणार आहे. (Mumbai News)
पंतनगरमधील पादचारीपूल सर्वाधिक लांबीचा एमएमआरडीएकडून ३२.३२ किमी लांबीच्या मेट्रो ४ मार्गिकेचे आणि कासारवडवली – गायमूख अशा २.८८ किमी लांबीच्या ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरू आहे. या मार्गिका टप्प्याटप्प्याने वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. आता एमएमआरडीएने ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकेतील मेट्रो स्थानकाबाहेर पडत इच्छितस्थळी वा रिक्षा थांबा, टॅक्सी थांबा तसेच बेस्ट स्थानक वा नजीकच्या रेल्वेस्थानकापर्यंत प्रवाशांना पोहचणे सोपे व्हावे यासाठी मेट्रो स्थानके पादचारीपुलाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार नुकत्याच विक्रोळी, पंतनगर, भांडूप आणि विजय गार्डन मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पादचारीपुलांची बांधणी करण्यासाठी एमएमआरडीएने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. निविदेनुसार पंतनगर मेट्रो स्थानक येथे ६६५ मीटर लांबीचा, विक्रोळी मेट्रो स्थानक येथे ३८७ मीटरचा, भांडूप मेट्रो स्थानक येथे ४५ मीटरचा, तर विजय गार्डन मेट्रो स्थानक येथे ६० मीटर लांबीचा पादचारीपूल बांधण्यात येणार आहे. या चारही पुलांसाठी १२९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, पंत नगरमधील पादचारीपूल सर्वाधिक लांबीचा, ६६५ मीटर इतका असणार आहे.
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…