भल्या पहाटे गायमुखजवळ ट्रकची बेस्ट बसला धडक! रस्त्यावर काचेचा खच

Share

ठाणे : घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात भल्या पहाटे ट्रक आणि मिजी बसचा अपघात झाला. ट्रकचा एक्सेल तुटल्याने चालकाचे ट्रकवरचे नियंत्रण सुटले आणि बाजूने जाणाऱ्या मिनी बसला धडकून पलटी झाला. गुजरातवरून हा ट्रक रिकाम्या दारूच्या बाटल्या घेऊन ठाण्याच्या दिशेने येत होता. या अपघातामुळे येथे जड अवजड वाहनांची काही तास कोंडी झाली होती.

गुजरात ते मुंबई अशी वाहतूक करणारा ट्रक (GJ 02 VV 3808) मंगळवारी पहाटे ३:०० च्या सुमारास गायमुख घाटाजवळ वाहतूक चौकीच्या बाजूला पलटला. ट्रकमध्ये असलेल्या दारूच्या काचेच्या रिकाम्या रस्त्यावर पसरल्याने सगळीकडे काचांचा खच पडला होता. जवळच चौकीत असलेले वाहतूक पोलिस जयदत्त मुंढे यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवून अपघाताची माहिती अग्निशमन दल आणि ठाणे महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. लागलीच या विभागांच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन हायड्रा मशीन आणि जेसीबीच्या मदतीने पलटी झालेला ट्रक बाजूला केला.

या अपघातात मुलुंड आगाराच्या बसला देखील (MH 01 EM 3914) ट्रकची धडक बसली होती. त्यात बसचे किरकोळ नुकसान झाले. तर ट्रकची बॉडी पूर्णपणे सडल्याने तो बाजूला करण्यासाठी बराच वेळ लागला. सुदैवाने मुलुंड मिरा रोडच्या मार्गावर धावणाऱ्या बेस्टच्या बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी संभाव्य हानी टळली. परंतु बस वाहक (कंडक्टर) हर्षल कासकर, वय ३२ यांच्या एका डोळ्याला दुखापत झाली. काचेचा तुकडा त्यांच्या डोळ्यात गेला. अपघाताच्या घटनेमुळे ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना सुमारे तीन तास कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडीत सापडलेला रस्ता सकाळी ६-७ वाजता मोकळा झाला.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

22 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

50 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

1 hour ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago