मुंबई(ज्ञानेश सावंत): चेन्नईच्या संघाची पराजयाची शृंखला काही तुटत नाही. मागील चार सामन्यापैकी तीन सामने चेन्नईने गमावले आहेत. तिन्ही सामन्यात चेन्नईचा धावांचा पाठलाग करताना पराजय झालेला आहे. चेन्नईच्या फलंदाजाकडे सातत्य नाही आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड चारपैकी दोन सामने खेळला व दोन सामन्यात लवकर बाद झाला. रचिन रवींद्र पहिले दोन सामने खेळला व उर्वरित दोन सामन्यात लवकर बाद झाला. राहुल त्रिपाठीने तर सुरुवातीचे तिन्ही सामने मिळून २३ धावा केल्या, फक्त गेल्या सामन्यात तो खेळला.
आता पर्यंत सर्वच सामन्यात एखादा खेळाडू चांगला खेळतो व बाकी सर्व १५-२० धावा काढून बाद होतात आणि म्हणून चेन्नईचा संघ धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरतो. आज चेन्नईला जास्ती जास्त धावा कशा होतील या कडे लक्ष द्यावे लागेल. धावांचा पाठलाग करण्याकरिता संघामध्ये महत्वाचे बदल करणे गरजेचे आहे. चांगल्या फिनिशरची चेन्नईला गरज आहे.
चेन्नईचा सामना आज होणार आहे पंजाबशी, ज्यांनी आता पर्यंत दोन सामने जिंकले आहेत व एक सामना गमावला आहे. पंजाबचा संघ चेन्नई संघा पेक्षा फलंदाजी मध्ये अव्वल स्थानावर आहे. पंजाबचे आघाडीचे सर्वच फलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत. पंजाबला गेल्या सामन्यातील चुका ह्या सामन्यात भरून काढव्या लागतील.
आजचा सामना पंजाब घरच्या मैदानावर खेळत आहे त्यामुळे त्यांना थोडे दडपण येऊ शकते. चला तर बघूया चंदिगढच मैदान कोणाला साथ देते.
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…