माझं काय चुकलं ?

Share

आमच्या गावचा बबलू
आळशीच आहे फार
शब्दाला मात्र सदानकदा
लावीत बसतो धार

शाळेत एकदा तो
खूपच उशिरा आला
सरांनी विचारले त्याला,
‘का रे उशीर झाला?’

बबलू म्हणाला, ‘गुरुजी,
आज आळसच लय आला
म्हणूनच शाळेत यायला
उशीर मला हो झाला…!’

गुरुजी म्हणाले, ‘अरे आपण
आळसाला शत्रू मानतो
प्रगतीच्या मार्गात आपल्या
अडथळा तो आणतो’

बबलू लगेच म्हणाला,
‘गुरुजी, माझं काय चुकलं?
शत्रूवरती प्रेम करा,
तुम्हीच आम्हास सांगितलं.’

गुरुजींना कळून चुकले
बबलू बोलण्यात तरबेज
फार सोयीचा अर्थ काढून
करी समोरच्याला गपगार !

काव्यकोडी – एकनाथ आव्हाड

१) नाजूक हिरवी
कोवळी किती
लहानशा झुळकीनेही
कमरेत वाकती

जमिनीवर हिरवीगार
जणू शाल अंथरते
जनावरांचे लुसलुशीत
अन्न कोण होते?

२) श्री लिहून काहीजण
करतात सुरुवात
घरचा पत्ता लिहितात
उजव्या कोपऱ्यात

मायना लिहून
नमस्कार करतात
शेवटी ता.क. लिहून
गोडी कोण वाढवतात?

३) झाड होऊन
शितल छाया धरतो
झरा होऊन
खळखळून हसतो

नदी होऊन
पुढे जाण्यास सांगतो
देण्यातला आनंद कोण
लुटण्यास शिकवतो?

उत्तर –

१) गवत
२) पत्र
३) निसर्ग

Recent Posts

भारताच्या हल्ल्यात मारला गेला जैश – ए – मोहम्मदचा कमांडर रउफ असगर, भारतीय विमान अपहरणाचा होता सूत्रधार

इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…

42 minutes ago

रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त; भारताच्या ड्रोन हल्ल्याने पाकिस्तान हादरला!

पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…

2 hours ago

Mumbai Rain Update: मुंबईकरांना अवकाळी पाऊसाने झोडपले, ‘या’ भागात यलो अलर्ट

मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…

2 hours ago

१६ वर्षांपूर्वीचा बॉम्बस्फोट, पण अजूनही निकाल नाही!

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…

2 hours ago

नालेसफाई नव्हे, ही तर भ्रष्टसफाई! पालकमंत्री आशिष शेलार यांचा थेट हल्ला

मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…

3 hours ago

‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरुच! दहापट उत्तर देणार, पाकिस्तानची घाबरगुंडी, केंद्राची सर्वपक्षीय ताकद एकवटली

नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…

3 hours ago