मुंबई : विकास, समृद्धी ही उद्धव ठाकरेंची कामंच नाहीत. शिव्या घालणं आणि चांगल्या कामात विघ्न आणणं हेच उद्धव ठाकरेंचं काम आहे. यामुळे त्यांचा पक्ष लहान होत चालला आहे. पुढच्या निवडणुकीनंतर हा पक्ष राहणार नाही, असे भाजपा खासदार नारायण राणे म्हणाले. ते रामनवमीनिमित्त शिर्डीत सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आले होते. याप्रसंगी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासंदर्भात प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तरं देताना चांगल्या कामात विघ्न आणणं हेच उद्धव ठाकरेंचं काम आहे, असे भाजपा खासदार नारायण राणे म्हणाले.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नालाही भाजपा खासदार नारायण राणे यांनी उत्तर दिले. संजय राऊत या व्यक्तीने खासदार म्हणून देशासाठी, राज्यासाठी आणि स्वतःच्या गावासाठी काय योगदान दिले आहे ? असा प्रतिप्रश्न खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला. काही तरी बोलून चर्चेत राहणे आणि वाद निर्माण करत राहणे हेच काम संजय राऊत करत असल्याचे खासदार नारायण राणे म्हणाले.
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…