मुंबई: आयपीएल २०२५मध्ये शनिवारी झालेल्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला २५ धावांनी हरवले. या सामन्याचा हिरो ठरला केएल राहुल त्याने ५१ बॉलमध्ये ७७ धावांची खेळी केली. दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सला ५० धावांनी हरवले. यात जोफ्रा आर्चरने ३ विकेट घेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला. या दोन्ही सामन्यात यजमान संघाचा पराभव झाला. यासोबतच दिल्ली कॅपिटल्सचा संघ पॉईंट्सटेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे.
चेपॉकमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने १८३ धावा केल्या होत्या. केएल राुलने संघासाठी सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली. आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सने ७४ धावांत ५ विकेट गमावले होते. धोनी जेव्हा क्रीझवर आला तेव्हा सीएसकेला ५६ बॉलमध्ये ११० धावा हव्या होत्या. एमएस धोनीने ३० धावा केल्या मात्र यासाठी २६ बॉल वापरले. सीएसके आपल्या आव्हानापासून २५ धावा मागे राहिली.
दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना २०५ धावा केल्या. यशस्वी जायसवालने ६७ आणि रियान परागने नाबाद ४३ धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने आपले २ विकेट पहिल्याच षटकांत गमावले होते. नेहल वढेराने सर्वाधिक ६२ धावा केल्या मात्र पंजाबच्या विजयासाठी या पुऱ्या पडल्या नाहीत. पंजाबला १५५ धावाच करता आल्या.
दिल्ली कॅपिटल्स विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी तीन सामने जिंकले असून त्यांचे ६ गु आहेत. तर पंजाब किंग्सचा संघ पहिल्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर घसरला आहे. राजस्थानने पंजाबविरुद्धचा सामना जिंकल्याने त्यांनी मोठी झेप घेतली आहे. राजस्थान ९व्या स्थानावरून ७व्या स्थानावर आला आहे. त्यांचा ४ सामन्यांतील दुसरा विजय आहे. तर चेन्नई सुपर किंग्स८व्या स्थानावरून ९व्या स्थानावर आले आहेत. सगळ्यात खालच्या स्थानावर सनरायजर्स हैदराबाद आहे त्यांनी ४ पैकी एकच सामना जिंकला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ ८व्या स्थानावर आहे.
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…