बारामती : बारामतीमधील (Baramati News) एका हॉटेल मॅनेजरला काही जणांनी बेदम मारहाण (Crime) केल्याची घटना घडली. या घटनेची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, या घटनेची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतली आहे. संबंधित घटना ही सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अशा घटना वारंवार घडल्या तर आपण थेट मकोका लावू, असा इशारा अजित पवारा यांनी दिला आहे.
मी काय कायम तुमच्यासोबत नाही. काळाच्या पुढं काही करता येत नाही. पण काम करताना नीट करतो. त्यामुळे पुढची लोकं म्हणतील चांगलं काम केलं. परवा माझ्याकडे क्लिप आली. सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालं. त्याच्यामध्ये एकाला मारहाण केली. कुत्र्याला जसं मारत असतील तस मारलं. फुटबॉल कसा खेळाला जातो तसा ते लाथा बुक्क्या मारत चालले होते. मी पोलिसांना सांगितलं, कोणीही असो त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. मी असलं अजिबात खपवून घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले.
त्याचबरोबर असे काही गुन्हे लागतील की ते सतत अशे गुन्हे करत राहिले तर पुढे मोकका पण लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला. तर मेहरबानी करा कोणीही कायदा हातात घेऊ नका, कोणी काही चुकीच कैलं तर पोलिसांकडून येऊन तक्रार करा असे आवाहन त्यांनी केलं. १४ तारेखेला घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. संविधानाची ७५ वर्ष पूर्ण झाली आहे, तरी काहीकाही जण स्वतःच्या घरीची मालमत्ता असल्यासारखं एखाद्याला बदडून काढत आहेत. हे होता कामा नये. असे देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
तुमची मुलं काय करताहेत कुठं चुका करताहेत हे पाहणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबादारी पालकांनी पार पाडवी मग मला मुंबईला फोन येतात. दादा चुकलं एकदा पोटात घ्या. आरं पोट फुटायला लागलं आणि काय म्हणतो पोटात घ्या, अशी मुश्किल टिपण्णी देखील अजित पवार यांनी यावेळी बोलताना केली. सांगणाऱ्याला पण लाज, लज्जा काही शरम काही कशी वाटत नाही. एवढे त्याला बेदम मारलं. यामुळे शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही, असे देखीलb ते म्हणाले. (Ajit Pawar)
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…