मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या(Team India) २०२५ मध्ये भारतात होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. हे वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले (bcci). भारत या हंगामात वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ कसोटी सामने, ३ एकदिवसीय आणि ५ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे.
भारतातील हंगामाची सुरुवात २ ऑक्टोबर २०२५ रोजी अहमदाबादमध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेने होईल. मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी १० ऑक्टोबरपासून कोलकाता येथे होणार आहे.
वेस्ट इंडिज मालिकेनंतर, भारत तिन्ही फॉरमॅटमध्ये रोमांचक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ कसोटी सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत सुरू होईल, तर यातील दुसरा सामना ऐतिहासिक असेल, कारण गुवाहाटी येथे हा सामना होणार आहे. गुवाहाटीत पहिल्यांदाच कसोटी सामना होईल. हा सामना बारसपरा स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून रंगणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळतील, अंतिम सामना अहमदाबादमध्ये होईल.
पहिली कसोटी: २ ते ६ ऑक्टोबर २०२५, अहमदाबाद
दुसरी कसोटी: १० ते १४ ऑक्टोबर २०२५, कोलकाता
पहिली कसोटी: १४ ते १८ नोव्हेंबर २०२५, नवी दिल्ली
दुसरी कसोटी: २२ ते २६ नोव्हेंबर २०२५, गुवाहाटी
पहिला एकदिवसीय सामना: ३० नोव्हेंबर २०२५, रांची
दुसरा एकदिवसीय सामना: ३ डिसेंबर २०२५, रायपूर
तिसरा एकदिवसीय सामना: ६ डिसेंबर २०२५, विशाखापट्टणम
पहिला टी-20 सामना: ९ डिसेंबर २०२५, कटक
दुसरा टी-20 सामना: ११ डिसेंबर २०२५, नवी चंदीगड
तिसरा टी-20 सामना: १४ डिसेंबर २०२५, धर्मशाला
चौथा टी-20 सामना: १७ डिसेंबर २०२५, लखनऊ
पाचवा टी-20 सामना: १९ डिसेंबर २०२५, अहमदाबाद
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…