विद्यानगरी मेट्रो स्थानकातील ‘बी १’ मध्ये नो एंट्री

Share

७ एप्रिलपर्यंत प्रवेशद्वार बंद ठेवण्याचा एमएमआरसीचा निर्णय

मुंबई : ‘कुलाबा–वांद्रे–सीप्झ मेट्रो ३’मार्गिकेतील आरे–बीकेसी टप्प्यातील विद्यानगरी मेट्रो स्थानकातील ‘बी १’ प्रवेशद्वार तांत्रिक कारणासाठी मंगळवारपासून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १ ते ७ एप्रिलपर्यंत हे प्रवेशद्वार बंद राहणार असून ८ एप्रिलपासून हे प्रवेशद्वार पुन्हा प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे. या कालावधीदरम्यान पर्यायी प्रवेशद्वाराचा वापर करण्याचे आवाहन एमएमआरसीकडून करण्यात आले आहे.

एमएमआरसीकडून ३३.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे-ते बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ पासून सेवेत दाखल झाला. ही मार्गिका खुली होऊन काही महिने होत नाही तोच एमएमआरसीने देखभालीची कामे हाती घेतली आहेत. देखभालीच्या कामासाठी विद्यानगर मेट्रो स्थानकावरील ‘बी १’ प्रवेशद्वार मंगळवार, १ एप्रिल रोजी सकाळपासून बंद करण्यात आले.

एमएमआरसीने ‘एक्स’ समाज माध्यमावर दिलेल्या माहितीनुसार विद्यानगरी मेट्रो स्थानकावरील ‘बी १’ प्रवेशद्वार १ ते ७ एप्रिल या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे आठवडाभर ‘बी १’ प्रवेशद्वार बंद असणार असून प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दरम्यान, आरे–बीकेसी मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होऊन काही दिवस होत नाही तोच एमएमआरसीने प्रवेशद्वार बंद केले आहे वा सेवा वेळेत कपात करण्यात येत असल्याचे म्हणत प्रवाशांकडून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

4 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

4 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

4 hours ago