अंबरनाथ : अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी गोंधळ घातला. बँकेचे अमराठी बँक मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तरे दिल्याने संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. यावेळी मराठीत बोलता येत नसेल, तर तुमच्या राज्यात निघून जाण्याचा इशारा मनसैनिकांनी मॅनेजरला दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मराठीचा मुद्दा मांडत, बँका तसेच आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होतो की नाही, याची पाहणी मनसैनिकांनी करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार मनसे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.तसेच रिझर्व बँकेच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे बँकेचे व्यवहार मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचे पत्र मनसेकडून सर्व बँकांना देण्यासाठी अंबरनाथमध्ये शहराध्यक्ष कुणाल भोईर, शहर संघटक स्वप्निल बागुल आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव आदी पदाधिकारी गेले होते.
दरम्यान मनसेचे पदाधिकारी बँकेत गेले असताना अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शाखा व्यवस्थापकाकडे पत्र देण्यासाठी गेले होते. यावेळी बँकेचे शर्मा नामक अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी येत नसल्याचं सांगितले. यावरून मनसेचे पदाधिकारी अधिक आक्रमक होऊन मराठी येत नसल्यास तुमच्या राज्यात जाऊन काम करा, असा इशारा त्यांना दिला.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा देताच या ब्रँच मॅनेजरने आमच्या पुण्याच्या मुख्य शाखेला जाऊन सांगा, असे उत्तर दिले. यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांचा अधिक संताप झाल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी ब्रँच मॅनेजरच्या केबिनमध्ये गोंधळ घातला. तसेच बँकेचे व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…