बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना अडकवण्यासाठी एका महिलेला तयार करण्यात आले होते, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला आहे. या महिलेची सात-आठ दिवसांपूर्वी हत्या झाल्याची माहिती समोर येत असून, या प्रकरणाने बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
गुरुवार (२७ मार्च २०२५) रोजी बीडमधील कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत एका महिलेचा मृतदेह घरात सडलेल्या अवस्थेत आढळला. या महिलेने वेगवेगळ्या “मनीषा आकुसकर”, “मनीषा बिडवे”, “मनीषा बियाणी” आणि “मनीषा गोंदवले” या नावांनी आपली ओळख बदलून विविध ठिकाणी वावर केला होता.
सदर महिला सुदर्शन घुलेच्या संपर्कात होती आणि संतोष देशमुख यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार होती, अशी चर्चाही रंगली आहे. मात्र, या दाव्याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
सदर महिलेला ठार मारण्यामागे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धागेदोरे नष्ट करण्याचा डाव आहे की तिचा मृत्यू अनैतिक संबंधातून झाला? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. बीड पोलिसांना ही माहिती उशिराने मिळाली आणि पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर महिलेचा मृतदेह पूर्णतः सडलेला आढळला.
बीड पोलिसांनी घटनास्थळीच शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार उरकले असून, या हत्येचा सखोल तपास सुरू आहे. शहरात घडलेल्या या घटनेने भय आणि तर्कवितर्कांना उधाण आले असून, पोलिस तपासातूनच आता खरी माहिती समोर येईल, असे बोलले जात आहे.
ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी ती खाली दिलेल्या नावांचा वापर करायची
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…