येत्या तीन दिवसात महाराष्ट्रासह ३ ते ४ राज्यांत पावसाची शक्यता

Share

मुंबई : उत्तर भारतात उन्हाचा तडाखा वाढणार आहे. सोमवारपासून पुढील तीन दिवस तापमानात पाच ते सात अंश सेल्सिअसपर्यंतची वाढ होण्याचा अंदाज आहे. तर काही राज्यांत उन्हाच्या कडाक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३१ मार्चपासून ३ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील काही भाग, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आदी राज्यांमधील वातावरण बदलणार आहे. यातील केरळ आणि कर्नाटकात २ आणि ३ एप्रिलला मुसळधार पाऊस कोसळेल, असाही अंदाज आहे. तर पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये १ ते ३ एप्रिल, महाराष्ट्रातील विदर्भात १ एप्रिल, पूर्व मध्य प्रदेशात २ आणि ३ एप्रिल, उर्वरित महाराष्ट्र, गुजरातमध्ये ३१ मार्च ते ३ एप्रिल, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकात १ ते ३ एप्रिल या कालावधीत पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. जोरदार वाऱ्यासह वादळी तडाख्याचीही शक्यता आहे. या राज्यांमध्ये वातावरणात अचानक बदल होणार असून, काही ठिकाणी ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील.

गेल्या २४ तासांत पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, आसाममध्ये जोरदार वारे वाहत होते. पश्चिम बंगालच्या काही भागांत उष्णतेच्या लाटांनी तडाखा दिला.अरुणाचल प्रदेशात ३० आणि ३१ मार्च, त्रिपुरात ३१ मार्च या कालावधीत जोरदार वारे वाहतील. तर पाऊस आणि वादळी वाऱ्याचाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम हिमालयाचा भाग, मध्य, पूर्व आणि दक्षिण भारतात वातावरणात कोणताही बदल होणार नाही असा अंदाज आहे. बिहार राज्यातील काही भागात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालसह, सौराष्ट्र, कच्छ आदी भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून ३१ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आसाममध्ये ३० मार्चपासून १ एप्रिल, त्रिपुरामध्ये ३० मार्चपासून ३ एप्रिल, तामिळनाडू, पद्दूचेरी, कराईकल, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, यनम, केरळ आदी ठिकाणी ३० आणि ३१ मार्च या कालावधीत पारा वाढणार असून, आर्द्रताही वाढणार आहे.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

3 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

3 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

3 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

3 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

4 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

5 hours ago