नवी दिल्ली : म्यानमारमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढली आहे. जुंटा सरकारने सोमवारी नवा आकडा जाहीर केला. या भीषण भूकंपामध्ये बळी गेलेल्यांची संख्या वाढून २,०५६ झाली आहे. तसेच या भूकंपामध्ये ३९००हून अधिक जण जखमी झाले. बचावकार्य अद्यापही सुरू असून मलब्याखाली दबलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढले जात आहेत.
म्यानमारमध्ये विनाशकारी भूकंपानंतर येथे एका आठवड्यासाठी राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला आहे. येथे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या २०००पेक्षा अधिक आहे. दरम्यान, मलब्याखाली जिवंत माणसे सापडतील याची आशाही मावळत चालली आहे.
शुक्रवारी आलेल्या ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठी जिवितहानी झाल्याने संवेदना व्यक्त करण्यासाठी ६ एप्रिलपर्यंत राष्ट्रीय ध्वज अर्ध्यापर्यंतच फडकत राहतील.
रिपोर्टनुसार, एका महिलेला एका हॉटेलच्या मलब्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले. भूकंपाच्या तीन दिवसानंतरही ही महिला जिवंत होते. येथे अद्याप बचावकार्य सुरू असून मलब्याखाली कोणी जिवंत आहे का याचा शोध घेतला जात आहे.
सदर महिलेला मांडले स्थित ग्रेट वॉल हॉटेलच्या मलब्यातून बाहेर काढण्यात आले. या महिलेची स्थिती स्थिर आहे. मांडले हे ठिकाण २८ मार्चला आलेल्या भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळ आहे. भूकंपामुळे म्यानमारमध्ये मोठा हाहाकार निर्माण झाला मात्र शेजारील देश थायलंडमध्येही मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीटदर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने आजपासून…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…