शिर्डी : करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी सर्वसामान्य भाविकांना व्हीव्हीआयपी च्या दर्शनामुळे वेठीस राहावा लागत असल्याने व्हीव्हीआयपी भाविकांची वेळ तिरुपतीच्या बालाजी देवस्थानच्या धर्तीवर करण्यात करण्यात यावी आणि ती आम्ही अंमलात आणायचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी खा. डॉ सुजय विखे यांनी शिर्डीत प्रसार माध्यमांशी बोलतांना केले.
दरम्यान देशातील तिरुपती नंतर नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा मंदिरातील व्हीव्हीआयपी भाविकांच्या दर्शन वेळेत बदल कारण्यासंदर्भात माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हटले की, साई मंदिराचा दर्शन कालावधी ठरलेला आहे, तोपर्यंत सर्वसाधारण भाविक दर्शन घेत राहील. मात्र जे व्ही. व्ही.आय.पी पासद्वारे पैसे देऊन दर्शन घेतात. त्यांच्या दर्शन वेळेत बदल कलेला पाहिजे. ज्याप्रमाणे तिरुपतीला कधीही व्हीआयपी पास काढला तर त्याला दर्शनाची वेळ ही पहाटे चार ते सकाळी सहा वाजेपर्यंत ठरलेली असून याठिकाणी दिवसभरात कधीही दर्शनाचा पास मिळत नाही.त्या पार्श्वभूमीवर आम्ही साईबाबा संस्थानकडे मागणी केली आहे की, तिरुपतीच्या धर्तीवर त्याचा अभ्यास करून तेथील व्ही.आय.पी भाविकांची पहाटेची दर्शन व्यवस्था कशी अमलात आणता येईल, यासंदर्भात प्रयत्न करावा.
या मागणीमुळे सर्वसामान्य भाविकांचा दर्शनाचा अधिकार कुणीही काढून घेत नसून सर्वसामान्य साईभक्तांचे दर्शन सुरूच राहणार आहे.त्यांच्या दर्शन रांगेत कुठेच व्यत्यय होणार नाही. माझा प्रश्न व्ही.आय.पी दर्शन संदर्भात आहे. जे व्ही.आय.पी आल्याने ज्या रांगा थांबविल्या जातात. सामान्य भाविकाला वेठीस धरले जाते, हा प्रकार होणार नाही. त्यामुळे व्ही.आय.पी भाविकांची वेळ वेगळी ठेवा आणि सर्वसामान्य भाविकांची दर्शन हे पाहिल्या सारखेच सुरु ठेवा आणि व्ही.आय.पी निश्चित करा. जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना दर्शनाची अडचण होणार नाही, ही माझी प्रामाणिक भावना असून ती अंमलात आणायचा प्रयत्न करणार असल्याचे माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…