नवी दिल्ली: म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी आलेल्या भूकंपाने मोठा हाहाकार माजवला आहे. शनिवारीही भूकंपाचे झटके जाणवले. शनिवारी दुपारी भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. भारताने भूकंपाचा धक्का बसलेल्या म्यानमार आणि थायलंडच्या मदतीसाठी ऑपरेशन ब्रम्हा अंतर्गत मेडिकल टीम पाठवली आहे. म्यानारमध्ये भूकंपामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १६४४ वर पोहोचली आहे.
म्यानमारमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत सातत्याने बचावकार्य करत आहे. भारताने संवेदना प्रकट करताना शक्य होईल तितके मदतीचे आश्वासन दिले आहे. भारताने ऑपरेशन ब्रम्हा अंतर्गत स्पेशल मेडिकल टास्क फोर्स बचाव कार्यासाठी तैनात केले आहे.
लेफ्टनंट कर्नल जगनीत गिलच्या नेतृत्वात ११८ सदस्यीय मेडिकल टीम म्यानमारसाठी रवाना झाली आहे. ही टीम एअरबोर्न एंजल्स टास्क फोर्सचा भाग आहे.
शुक्रवारी चीन, म्यानमार, थायलंड आणि भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. म्यानमारमध्ये पहिला भूकंप १२.५० वाजता आला. याची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदु म्यानमारच्या सागाईंग शहराच्या जवळ पृथ्वीच्या १० किमी खोल होता. युनायटेड स्टेटस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की १२ मिनिटांनंतर दुसरा भूकंप आला. याची तीव्रता ६.४ इतकी होती. या भूकंपानंतर म्यानमार आणि थायलंडमध्ये जनजीवत पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…