छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये सुकमा आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. मोहीम अद्याप सुरू आहे. चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.
सुरक्षा पथकाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार २९ मार्च २०२५ रोजी सकाळी चकमक सुरू झाली. ही चकमक केरलापाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जंगलात सुरू आहे. डीआरजी अर्थात डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (जिल्हा राखीव जवान) आणि सीआरपीएफ अर्थात सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (केंद्रीय राखीव पोलीस दल) यांनी संयुक्त कारवाई केली. याआधी मंगळवारी सुरक्षा पथकांनी दंतेवाडा जिल्ह्यात तीन नक्षलवाद्यांना ठार केले. ठार केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये २५ लाखांचे बक्षिस लावलेल्या सुधीर उर्फ सुधाकर उर्फ मुरली नावाच्या नक्षलवाद्याचाही समावेश आहे. घटनास्थळावरुन इंसास रायफल, ३०३ रायफल आणि इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
भोपालपट्टनममध्ये तीन महिन्यांत ७८ नक्षलवादी ठार
छत्तीसगडमधील भोपालपट्टनममध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत सुरक्षा पथकांनी ७८ नक्षलवादी ठार केले. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवणार असे जाहीर केले. ही घोषणा झाल्यापासून सुरक्षा पथकांच्या नक्षलवाद्यांच्या विरोधातील मोहिमा वाढल्या आहेत.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…