Attack on Hindu : पश्चिम बंगालमधील माल्दामध्ये हिंदू संकटात, विरोधी पक्षनेत्याचे राज्यपालांना पत्र

Share

माल्दा : पश्चिम बंगालमधील माल्दामध्ये हिंदू संकटात आहेत. हिंदूंच्या मालमत्तांना लक्ष्य करुन हल्ले करणे, हिंदूंना घाबरवणे असे प्रकार सुरू आहेत. प्रामुख्याने हिंदूंच्या वाहनांना आणि दुकानांना लक्ष्य केले जात आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी तातडीने माल्दामध्ये केंद्रीय सुरक्षा पथकांना बोलवावे, अशी मागणी करणारे पत्र पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांना लिहिले आहे. माल्दा जिल्ह्यातील मोथाबारीमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे मोथाबारीमध्ये तातडीने केंद्रीय सुरक्षा पथकांना नियुक्त करावे, अशीही मागणी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांच्याकडे केली आहे. राज्यपालांनी केंद्रीय सुरक्षा पथके नियुक्त करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारला आवश्यक ते निर्देश द्यावे; अशी मागणी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केली आहे.

याआधी केंद्रीय शिक्षणमंत्री आणि पश्चिम बंगाल भाजपाचे अध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनी गुरुवारी संध्याकाळी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडीओ पोस्ट करुन मालदा जिल्ह्यातील मोथाबारी येथे हिंदूंवर हल्ला झाल्याचे सुकांत मुजुमदार म्हणाले. या घटनेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपालांना पत्र लिहिले. ममता बॅनर्जींचे सरकार मुसलमानांचे लांगुलचालन करण्यात मग्न आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला.

पश्चिम बंगालचे पोलीस ममता बॅनर्जी सरकारचे आदेश पाळत असल्यामुळे मुसलमानांनी काहीही केले तरी मूग गिळून गप्प बसतात. हिंदूंवर मुसलमान हल्ले करत असले तरी पोलीस हे हल्ले थोपवण्यासाठी ठोस उपाय करताना दिसत नाहीत. पश्चिम बंगाल सरकारचे वर्तन हिंदूंसाठी धोकादायक आणि राज्यातील कायदा – सुव्यवस्था बिघडवणारे असे आहे, अशी तक्रार सुवेंदू अधिकारी यांनी केली.

Recent Posts

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

5 minutes ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

19 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

34 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

1 hour ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago