Chhatrapati Sambhajinagar News : दत्तक घेतलेल्या ४ वर्षीय चिमुरडीला आई वडिलांनी संपवलं!

Share

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड येथे धक्कादायक घटना घडली आहे. ४ मुलानंतर मुलगी नाही म्हणून दत्तक घेतलेल्या ४ वर्षीय मुलीला सावत्र आई वडिलांनी मारहाण करुन तिचे हात-पाय मोडेपर्यंत तिला मारहाण करत तिची हत्या केली. या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड येथे राहणाऱ्या फौजिया शेख फईम आणि शेख आयुब फईम या नराधम आई वडिलांनी ४ मुलांनंतरही मुलगी होत नसल्याने एका चार वर्षीय मुलीला जालना येथून ५ हजाराला दत्तक घेतले होते. पतीच्या या निर्णयाला पत्नीचा विरोध होता. त्यामुळे या दोघांमध्ये खटके उडायला लागले होते. दोघांमधील वादाचं कारण ठरत असलेल्या चिमुरडीला दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. या दांपत्याने त्या चिमुरडीचा अमानुष छळ सुरू केला. नराधम आई वडील तिला उपाशी ठेवायचे. बुधवारी रात्रीही जळत्या लाकडाने तिच्या पूर्ण अंगावर दोघांनी चटके दिले. तिचे हात व तळ पाय सांध्यातून मोडेपर्यंत तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्या डोक्यात व पाठीत वजनदार वस्तूने जोरात वार करुन तिला गंभीर जखमी करण्यात आलं. विव्हळत असलेल्या चिमुकलीने अखेर बुधवारी (दि २६) मध्यरात्री तीन वाजता प्राण सोडले. या नराधम आई वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Recent Posts

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

19 minutes ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

23 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

36 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

56 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

1 hour ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

1 hour ago