नाशिक : कळवण तालुक्यामध्ये बांगलादेशी शेतकऱ्यांनी शेतकरी पीक विम्याचा (PM Kisan Scheme) लाभ घेतल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी यांनी पोलीस ठाण्यामध्ये १८१ बोगस शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अलीकडच्या काळामध्ये भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कळवण भागाचा दौरा करून या ठिकाणी बांगलादेशी नागरिकांनी या ठिकाणी बोगस शेतकरी असल्याचे सांगत शासनाच्या पंतप्रधान किसान विमा योजनेचा लाभ घेतल्याची माहिती कृषी अधिकारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. यानंतर या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात आला.
मालेगावमध्ये बांगलादेशी नागरिकांविरोधात किरीट सोमय्या यांचे आंदोलन सुरूच आहे आणि त्यानंतर त्यांनी या प्रकरणावर आपले लक्ष केंद्रित केले होते. बाबत कळवणच्या तालुका कृषी अधिकारी मिलन म्हस्के यांनी कळवण पोलीस ठाण्यामध्ये पंतप्रधान किसान विमा योजनेचा सुमारे १८१ शेतकऱ्यांनी लाभ घेऊन शासनाची दोन कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये जे आरोपी आहेत त्यांनी प्रत्यक्ष दर्शनी शेतकरी नसल्याचे समोर आल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणी तपास करीत असून हे सर्व नागरिक हे बांगलादेशी असल्याचे निदर्शनास प्रथमदर्शनी आल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टेंभेकर हे अधिक तपास करीत आहेत.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…