Share

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचे कामकाज सुरू असताना दुपारी काही सेकंदांसाठी विधान भवनाच्या इमारतीचा वीज पुरवठा खंडीत झाला. जनरेटर बॅकअप असल्यामुळे कामकाज ठप्प झाले नाही. पण दोन्ही सभागृहात दिवे चमकल्यामुळे वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाल्याचे काही जणांच्या लक्षात आले.

याआधी सकाळच्या सत्रात विधानसभेत उपाध्यक्षांची एकमताने निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून आमदार अण्णा बनसोडे यांचा अर्ज सादर झाला होता. उपाध्यक्ष पदासाठी विरोधकांकडून एकही अर्ज आला नव्हता. यामुळे बनसोडे यांच्या निवडीची औपचारिकता उरली होती. बुधवारी २६ मार्च रोजी अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली आणि औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नंतर इतर विषयांतील कामकाज झाले.

शेवटच्या दिवशी विधानसभेत चर्चा सुरू असताना आमदार राम कदम यांनी दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत या प्रकरणात तत्कालीन उद्धव सरकारने अधिकारांचा गैरवापर करत पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला. सत्तेत असताना उद्धव ठाकरेंचे समर्थक रिया चक्रवर्तीचे प्रवक्ते असल्यासारखे वागत बोलत होते, असाही आरोप आमदार राम कदम यांनी सभागृहात बोलताना केला. राम कदम यांनी आरोप करताच उद्धव समर्थकांनी सभागृहात नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पण राम कदम त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिले. उद्धव सरकारने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला की नाही आणि केला असल्यास नेमकी काय कृती केली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार राम कदम यांनी सरकारकडे केली. ही मागणी त्यांनी सभागृहात बोलताना केली.

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

11 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

45 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago