मुंबई : सलग सात दिवसांच्या वाढीनंतर आज शेअर बाजारात (Stock Market) मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ७२८ अंकांनी घसरून ७७,२८८ वर बंद झाला, तर निफ्टी १८१ अंकांनी घसरून २३,४८६ वर बंद झाला. बँक निफ्टीतही मोठी घसरण झाली असून तो ३९८ अंकांनी घसरून ५१,२०९ वर बंद झाला. बाजारातील सर्वाधिक विक्री आयटी आणि रिअल्टी क्षेत्रात दिसून आली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी नफा बुकिंगला प्राधान्य दिले. भारतीय कंपन्यांच्या मार्च तिमाही निकालांमध्ये काही कंपन्यांचे आर्थिक परिणाम कमकुवत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेही बाजार घसरण्याची शक्यता आहे. ‘बाय चायना, सेल इंडिया’ हा ट्रेंड पुन्हा सक्रिय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीनी शेअर्सच्या तुलनेत भारतीय शेअर्स महाग झाले असून परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा मळवाट स्वीकारल्याने बाजारावर दबाव वाढला आहे.
अमेरिकन बाजारात फार्मा आणि आयटी क्षेत्रांमध्ये मोठी विक्री दिसून आली. इराणवर अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आणि कच्च्या तेलाच्या साठ्यातील घटेमुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळेही जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे.
निफ्टी ऑटो निर्देशांक वगळता एनएसईवरील सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. निफ्टी पीएसयू बँक, आयटी, हेल्थकेअर आणि रिअल्टी निर्देशांकात एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली. विशेष बाब म्हणजे निफ्टी ऑटो निर्देशांकात केवळ ०.०२ टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवली गेली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी नफा बुकिंगला प्राधान्य दिले.
भारतीय कंपन्यांच्या मार्च तिमाही निकालांबद्दलच्या अंदाजांमुळे बाजारावर दबाव दिसून आला. काही कंपन्यांचे निकाल Q4F25 मध्ये अपेक्षेपेक्षा कमजोर असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
‘बाय चायना, सेल इंडिया’ ट्रेंड पुन्हा दिसू शकतो. चीनी शेअर्सच्या स्वस्त मूल्यांकनामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर्सची विक्री करू शकतात.
अमेरिकन बाजारातील फार्मा आणि आयटी क्षेत्रांमध्ये मोठी विक्री दिसून आली.
इराणवर अमेरिकेचे नवीन निर्बंध आणि कच्च्या तेलाच्या साठ्यात घट होण्याच्या भीतीमुळे तेलाच्या किमतीत वाढ झाली, याचा परिणाम बाजारावर दिसून आला.
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…