मुंबई : जलजोडणीधारकांना जलदेयकातील प्रलंबित अतिरिक्त आकारापासून विशेष सूट देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘अभय योजना’ राबविली जात आहे. या अभय योजने अंतर्गत थकीत जलदेयक रकमेचा एकरकमी भरणा केल्यास अतिरिक्त आकार माफ करण्यात येतो. येत्या ३१ मार्च २०२५ रोजी आर्थिक वर्षअखेर आहे. त्यामुळे, जलदेयकांच्या अधिदानाकरीता शनिवारी २९ मार्च २०२५, रविवारी ३० मार्च २०२५ या साप्ताहिक सुटी आणि सोमवारी ३१ मार्च २०२५ रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. तरी संबंधितांनी याचा लाभ घ्यावा व सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ पूर्वी जलदेयकांचा भरणा करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
मुंबईतील नागरिकांनी त्यांच्या जल देयकांचा भरणा जलदेयकाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत करणे बंधनकारक आहे. एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर अतिरिक्त आकारणी केली जाते. या अतिरिक्त आकाराबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्यासाठी ‘अभय योजना’ सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत जलदेयकातील प्रलंबित अतिरिक्त आकारापासून विशेष सूट देण्यात येत आहे. येत्या ३१ मार्च २०२५ रोजी आर्थिक वर्षअखेर आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना जलदेयकांचा भरणा करता यावा यासाठी शनिवारी २९ मार्च २०२५, रविवारी ३० मार्च २०२५ या साप्ताहिक सुटीच्या दिवशी आणि सोमवारी ३१ मार्च २०२५ रोजी रमजान ईद निमित्त सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी, जलजोडणीधारकांनी, शासकीय-निमशासकीय कार्यालयांनी थकीत जलदेयकांचे ३१ मार्च २०२५ पूर्वी पैसे भरावे आणि अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…