Traffic Rules : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात कारवाई

Share

१३ महिन्यांत ५२६ कोटी रुपयांचा दंड आकारला

मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या १३ महिन्यांत १ जानेवारी २०२४ ते ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाहतूक नियमांचे (Traffic Rules) उल्लंघन करणाऱ्या ६५,१२,८४६ वाहन चालकांविरोधात कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईत ५२६ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी केवळ १५७ कोटी रुपयांची वसुली वाहतूक पोलिसांनी केली आहे. तर ३६९ कोटी रुपयांची थकबाकी अजूनही राहिलेली आहे. ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून स्पष्ट केली आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ प्रकारच्या वाहतूक नियमभंग प्रकरणांमध्ये ४१ वाहतूक आणि १ मल्टिमीडिया विभागाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. मात्र, केवळ २०,९९,३९६ वाहन चालकांनी दंड भरला असून अद्याप ४४,१३,४५० वाहन चालकांनी दंड भरलेला नाही.

फ्लिकर आणि अंबर दिव्यांवर कारवाई

मुंबई वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करत फ्लिकर आणि अंबर दिवे वापरणाऱ्या ४७ वाहन चालकांविरोधात कारवाई करत २३,५०० रुपयांचा दंड आकारला आला. मात्र, यातील केवळ ७ वाहन चालकांनी ३,५०० रुपये दंड भरलेला आहे. यामध्ये मुंबई वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक कारवाई ही मरीन ड्राईव्ह परिसरात केली आहे. यामध्ये ३२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई आरटीआई कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले की, मुंबई वाहतूक पोलिसांनी समाधानकारक कारवाई केली असली तरीही अधिकाऱ्यांची व कर्मचारी वर्गाची कमतरता असल्याने मोठ्या प्रमाणावर दंड वसुली होत नाही. त्यामुळे दंड न भरलेल्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी एक विशेष वसुली मोहीम राबविण्याची गरज आहे. दंड वसुलीसाठी वाहनचालकांना डिजिटल नोटिसा पाठवाव्यात. मोठ्या थकबाकीदार वाहनधारकांची वाहने जप्त करण्याची प्रक्रिया राबवावी असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे.

Recent Posts

America on india Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

46 seconds ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

24 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

5 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

5 hours ago