Noida Breaking News : गायीच्या दुधामुळे महिलेचा मृत्यू

Share

नोएडा : उत्तरप्रदेशातील ग्रेटर नोएडामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ४० वर्षीय महिलेने गायीचं कच्चं दूध प्यायल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथील जेवरमधील थोरा गावातील एका ४० वर्षीय महिलेने गायीचं कच्चं दूध सेवन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेचा तपास केल्यानंतर निष्पन्न झालेल्या माहितीत असे आढळून आले की दूध सेवन केलेल्या गायीला रेबीज झाला होता. दूध देण्याच्या काही दिवस आधी या गायीला कुत्रा चावला होता. त्यामुळे गायीच्या शरीरात विष पसरले. गायीची प्रकृती ढासळत होती. त्यातच दोन महिन्यापूर्वी तिने वासराला जन्म दिला. परंपरेनुसार, गायीचे पहिले दूध गावात वाटले गेले. गायीची प्रकृती अधिक खराब होऊ लागल्यानंतर पशु चिकित्सककडून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गायीला रेबीजचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गायीचे दूध पिणाऱ्यांना रेबीजचे इंजेक्शन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

गायीच्या मालकिणीने आणि कुटुंबाने तात्काळ रेबीजचे इंजेक्शन घेतलं. पण शेजारी राहणाऱ्या ४० वर्षीय सीमा यांनी इंजेक्शन घेतलं नाही. काही दिवसानंतर सीमा यांची प्रकृती बिघडली. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या रिपोर्ट्सनुसार, सीमा यांचा मृत्यू रेबीजमुळे झाला.

Recent Posts

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

41 minutes ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

45 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

58 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

1 hour ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

2 hours ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

2 hours ago