IPL 2025: ६७ धावा आणि ७ विकेट्स…कुणालच्या फिरकीनंतर साल्ट-कोहलीचे वादळ, RCBसमोर KKR उद्ध्वस्त

Share

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२५चा पहिला सामना २२ मार्चला शनिवार कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने सात विकेटनी विजय मिळवला. आरसीबीच्या विजयात कृणाल पांड्या, फिल साल्ट आणि विराट कोहली यांची भूमिका महत्त्वाची ठरली. कृणाल पांड्याने आपल्या गोलंदाजीने कहर केला. तर साल्ट आणि कोहलीने फलंदाजीमध्ये केकेआरच्या गोलंदाजांना धुतले.

नरेनच्या विकेटनंतर अडखळली केकेआर

ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ एकवेळेस मोठ्या स्कोरच्या दिशेने जात होता. त्यांचा स्कोर ९.५ षटकांत एक विकेट बाद १०७ इतका होता. तेव्हा असे वाटत होते की केकेआर २००चा टप्पा गाठेल. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सुनील नरेन यांनी चौकार-षटकारांचा पाऊस सुरू ठेवला होता. दरम्यान, त्यानंतर खेळ पूर्णपणे पालटला. कृणालच्या फिरकीसमोर केकेआरचे काही चालेना. त्यांचे विकेट पडण्यास सुरूवात झाली. यामुळे केकेआर बॅकफूटवर आली. केकेआरला आरसीबीसमोर १७५ धावांचे आव्हान दिले.

१७५ धावांचे आव्हान पार करणे इडन गार्डन्सच्या मैदानावर कठीण होते. १७५ धावांचे आव्हान पार करणे इडन गार्डन्सच्या मैदानावर कठीण होते. तेही रात्रीच्या वेळेस मैदानावर ओस पडत असताना. केकेआरला सुरूवातीला विकेट्सची आशा होती. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरूवात धमाकेदार राहिली. विराट कोहली आणि फिल साल्टने मिळून केकआरच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी ५१ बॉलवर ९५ धावांची भागीदारी झाली.

Tags: Virat Kohli

Recent Posts

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

17 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

40 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

5 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

6 hours ago