खारघर मृत्यू प्रकरण; आयोजक जबाबदार संस्थेवर कारवाई करा

Share

पनवेल (प्रतिनिधी) : खारघरमधील इज्तिमाच्या कार्यक्रमाला आलेल्या रेहान शेख व फैजान शेखने शिवकुमार शर्मा या युवकाला जीवघेणी मारहाण केली आणि या हल्ल्यात शिवकुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीव गमवायला लागला. या क्रूर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकाराला जबाबदार असलेल्या संस्थेवर कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आक्रमकपणे विधिमंडळाच्या अधिवेशनात केली.

खारघर येथील सिडकोच्या कॉर्पोरेट पार्क मोकळ्या भूखंडावर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ रोजी अंजुमन मदरसा अरेबिया इस्लामिया कासिमुल हक्कानी मस्जिद या संस्थेच्या माध्यमातून इज्तिमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान,सिडकोने परवानगी देताना ध्वनी प्रदूषण,कायदा सुव्यवस्था, रहदारी व अन्य संबंधी घालून दिलेल्या अटी शर्तीचे पालन आयोजकांकडून झाले नाही. इज्तिमाच्या दिवशी सायंकाळी मोहम्मद रेहान शेख व अन्य एका इसमाने आयटी व्यावसायिक शिवकुमार शर्मा या युवकाला जबर मारहाण केली आणि या मारहाणीत सदर युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्या अनुषंगाने शिवकुमार शर्मा या युवकाने तक्रार दाखल खारघर पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. जखमी अवस्थेत पोलीस स्टेशनला असताना डोक्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अस्वस्थ अवस्थेत शिवकुमार शर्मा यांचा मृत्यू झाला. इज्तिमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने परवानगी घेताना वाहतूक, पार्किंग, स्वच्छता, सुरक्षा अशा विभागात प्रत्येकी ३०० असे एकूण १२०० व्हॉलिंटिअर लावणार असल्याचे सांगितले होते. तसेच इज्तिमाला ५० हजार लोकं उपस्थित राहणार असल्याचे त्यामध्ये सांगण्यात आले.मात्र,प्रत्यक्षात २ लाखापेक्षा जास्त लोकं या ठिकाणी उपस्थित राहिले. खारघर शहरातील उत्सव चौकाजवळ रस्ता क्रॉस करताना ही मारहाणीची घटना घडली. त्या ठिकाणी वाहतुक पोलीस तसेच आयोजकांचे व्हॉलिंटिअर हजर नव्हते. वाद होतोय, मारामारी होतेय आणि हेल्मेटच्या प्रहाराने जीव जाण्यापर्यंत मारहाण केली जाते मग मदत करायला कुणीही आले नाही जर त्या ठिकाणी आयोजकांचे व्हॉलेंटिअर होते तर त्यांनी यामध्ये मदत करायला हवी होती. मात्र तसे झाले नाही आणि यामध्ये शिवकुमार शर्मा यांचा नाहक जीव गेला. असे सभागृहाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगतानाच विशेष म्हणजे या इज्तिमाला ०४ डिसेंबर २०२४ ते ३० जानेवारी २०२५ पर्यंत अशी तब्बल ५८ दिवसांची परवानगी सिडकोने दिल्याचा प्रकारही त्यांनी उघडकीस आणला.

जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होणार होता तर तशी काळजी घेणे आयोजक संस्थेची जबाबदारी होती. म्हणूनच अप्रत्यक्षरित्या का होईना हि संस्था या मृत्यूला जबाबदार आहे. त्यामुळे अशा संस्थेला भविष्यकाळात कार्यक्रम करण्याची परवानगी देऊ नये तरच लोकांच्या जीविताचे संरक्षण होईल त्यामुळे अशी काळजी शासनाने घेण्याचीही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात आक्रमकपणे केली. त्याचबरोबरीने येथे जो कार्यक्रम झाला त्या खारघर ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात अनधिकृत मशिदी उभ्या राहत आहेत. या ठिकाणी हॉटेल बेसमेंटमध्ये नमाज पठणासाठी वेगवेगळ्या सुविधा मिळणार अशा ऑफर केल्या जातात त्या आशयाचे स्टिकर रेल्वेमध्ये लावले जात आहेत. आणि त्या अनुषंगाने आता खारघर तळोजा परिसराचा मुंब्रा करण्याचा घाट घातला जात आहे. आणि या प्रयत्नांना येथे कायद्याला कुठल्याही प्रकारचा स्थान नाही अशी स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या ठिकाणी असे प्रकार वारंवार घडणार असतील तर ती थांबवण्याची जबाबदारी शासनाची आहे. मुंबईची संस्था खारघरमध्ये आयोजन करते आणि नियम पायदळी तुडवते त्यामुळे भविष्य काळामध्ये असे कार्यक्रम आयोजनाला परवानगी देऊ नये अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली.

Recent Posts

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

12 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

35 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

5 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

6 hours ago