…म्हणून युजवेंद्र चहल आणि धनश्रीने घेतला घटस्फोट

Share

मुंबई : क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटावर मुंबईतील न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. न्यायालयाच्या निर्णयानुसार कोट्यवधी रुपयांची पोटगी देऊन युजवेंद्र चहल आता धनश्री वर्मापासून वेगळा झाला आहे.

घटस्फोटाचा अर्ज केल्यावर सहा महिने विभक्त राहावे लागते. पण क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघे मागील दोन वर्षांपासून वेगळे राहत होते. यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण करुन न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. हा निर्णय देऊन घटस्फोटाचे हे प्रकरण संपल्याचे न्यायालयाने जाहीर केले. आयपीएल सुरू होण्याआधीच घटस्फोटाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. यामुळे युजवेंद्र आता खेळण्यावर लक्ष केंद्रीत करू शकेल.

क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांनी २०२० मध्ये लग्न केले. लग्नानंतर ते दोन वर्षे एकत्र राहीले. पण या दोन वर्षांनंतर त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यामुळे न्यायालयात जेव्हा घटस्फोटाचे कारण विचारण्यात आले तेव्हा, या दोघांनाही एकत्र राहण्यात समस्या असल्याचे सांगितले. एकत्र राहायचे नाही आणि त्यामध्येच दोघांचे भले असल्याचे वाटते, असे दोघांनी न्यायालयाला सांगितले. यानंतर न्यायालयाने घटस्फोटावर शिक्कामोर्तब केले. आता यापुढे युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे पती-पत्नी नसतील.

युजवेंद्र चहल सध्या आरजे महावशला डेट करत असल्याची चर्चा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्यावेळी या दोघांचे फोटो व्हायरल झाले होते.

Recent Posts

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

18 minutes ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

22 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

35 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

55 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

1 hour ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

1 hour ago