मुंबई (प्रतिनिधी) : इंडियन प्रिमिअर लीग २०२५ हंगामापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सामन्यातील चेंडू वापराबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. आयपीएलचा १८ वा हंगाम सुरू होण्यास २ दिवस शिल्लक असताना मुंबईमध्ये आयपीएल संघांच्या कर्णधारांसोबत बीसीसीआयने बैठक घेतली. या बैठकीत गोलंदाजांना फायदेशीर ठरणारे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेंडूवर लाळ लावण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. त्याचबरोबर एका सामन्यात तीन चेंडूंचा वापर करण्यात येणार आहे.
आयपीएल मधील सामन्यात आता एकूण ३ नव्या चेंडूंचा वापर होणार आहे. या आधी सामन्यातील २ डावांसाठी २ नवे चेंडू मिळायचे. पण आता धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला २ चेंडूसह खेळावे लागणार आहे. नव्या नियमानुसार दुसऱ्या डावासाठी २ चेंडू देण्यात येणार आहे, ज्यापैकी दुसरा चेंडू ११ व्या षटकांनतर चेंडू वापरण्यात येईल. हा नियम रात्रीच्या सामन्यांमध्ये दवामुळे होणारा परिणाम टाळण्याच्या उद्देशाने बनवण्यात आला आहे. या नव्या नियमामुळे दव घटकामुळे टॉस जिंकणाऱ्या संघाला होणारा फायदा आता मिळणार नाही.
चेंडूला लाळ लावण्यावरील बंदी उठली
चेंडूला लाळ लावण्यावरील बंदी आता उठवण्यात आली आहे. त्यामुळे चेंडू चमकवण्यासाठी आता गोलंदाजांना आता लाळेची मदत घेता येणार आहे. मोहम्मद शमीने नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत नियम हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर बीसीसीआयकडून यावर सकारात्मक विचार करण्यात आला व आगामी आयपीएल हंगामात आता हा नियम हटवण्यात आला आहे. दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यानंतर शमी म्हणाला होता की, ‘आम्ही नेहमीच अधिकाऱ्यांना लाळेचा वापर करण्यासाठी परवानगीची विनंती करत असतो. जेणेकरून सामन्यांदरम्यान स्विंग आणि रिव्हर्सचा वापर करता येईल. शमीच्या या विनंतीचे व्हर्नान फिलँडर आणि टिम साउथी सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही समर्थन केले होते. कोविड-१९ साथीच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चेंडू चमकवण्यासाठी लाळ लावण्याच्या जुन्या पद्धतीवर बंदी घातली होती. २०२२ मध्ये, आयसीसीने ही बंदी कायम ठेवली. आयसीसीप्रमाणे बीसीसीआयने देखील आयपीएलमध्येही हा नियम लागू केला होता. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये गोलंदाजांना चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करता येणार आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…