पुणे : पुण्यात एका आयटी कंपनीत नोकरीसाठी अनेक तरुणी – तरुणींनी अर्ज केल्यामुळे भरती प्रक्रियेवेळी लांबच लांब उमेदवारांची रांग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेला काही दिवस होत नाहीत तोच पुण्यात महिला पोलीस भरतीवेळी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेक तरुणी जखमी झाल्या. अनेक तरुणींच्या पायाला दुखापत झाली.
पुण्यात बुधवार १९ मार्च २०२५ रोजी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात ‘पुणे कारागृह महिला पोलीस’ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. या भरतीसाठी तीन हजार तरुणींनी गर्दी केली होती. पहाटेपासून तरुणी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या आवारात आल्या होत्या. भरती प्रक्रिया सुरू व्हायला वेळ होता म्हणून प्रवेशद्वार अर्थात गेट बंद ठेवण्यात आले होते. पण मुलींची गर्दी झाली. गेट उघडल्यावर पटकन आत जाऊन भरतीसाठी पहिला क्रमांक लावायचा या हेतूने तरुणींमध्ये धक्काबुक्की झाली. रेटारेटीचा ताण पडला आणि मैदानाचे गेट तुटले. गेट तुटल्यामुळे उघडले आणि मुलींनी एकदम मैदानाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक तरुणी जखमी झाल्या. चेंगराचेंगरी झाल्यामुळें अनेक तरुणींच्या पायाला दुखापत झाली.
‘पुणे कारागृह महिला पोलीस’ भरती २०२२ – २३ पासून रखडली आहे. एकूण ५१३ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली. पण प्रत्येकवेळी वेगवेगळ्या कारणामुळे ही प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होत होता. यामुळे बुधवारी संधी मिळवण्याच्या धडपडीत तरुणींची गेटजवळ धक्काबुक्की झाली. यातून पुढे चेंगराचेंगरी झाली. पोलीस प्रशासनाच्या नियोजनात ढिसाळपणा होता. यामुळेच चेंगराचेंगरी झाली, असा आरोप चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या महिला पोलिसांच्या कुटुंबियांनी केला. तर चेंगराचेंगरी झालेली नाही पण किरकोळ स्वरुपाची धक्काबुक्की, रेटारेटी झाली; असे पोलिसासांनी सांगितले.
भरतीसाठी आलेल्या अनेक तरुणींसोबत त्यांचे पालक आल्यामुळे गर्दी झाली होती. गेटजवळ थोडी धक्काबुक्की, रेटारेटी झाली. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस प्रशासनाने लांबून आलेल्या तरुणी आणि त्यांच्या पालकांसाठी राहण्याची व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेचा उपयोग तरुणी आणि त्यांचे पालक घेऊ शकतील, असे पोलीस प्रशासनाने सांगितले.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…