Categories: क्रीडा

BCCI फॅमिली नियमावर ठाम

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सचिव देवजित सईकिया यांच्या वक्तव्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने बीसीसीआय च्या कठोर नियमांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या नवीन नियमांनुसार विदेश दौऱ्यादरम्यान खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहण्यासाठी दिला जाणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आहे. यावर कोहलीने सडेतोड भूमिका मांडली. तो म्हणाला की, ‘हॉटेलच्या खोलीत एकटा उदास बसण्यापेक्षा मैदानावरच्या कठीण आणि तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी मी नेहमीच आपल्या कुटुंबीयांना सोबत ठेवणे पसंत करतो,’ असे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली होती. तथापि, बीसीसीआय ने बुधवारी स्पष्ट केले की, खेळाडूंसाठी लागू असलेले नियम तसेच कायम राहतील आणि त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. तसेच विराट कोहलीच्या नाराजी विधानानंतर बीसीसीआय सचिवांनी दिलेली ही प्रतिक्रिया खूप महत्त्वाची मानली जात आहे. कोहलीच्या नाराजीचा कसलाही परिणाम बीसीसीआयवर झालेला नाही. बीसीसीआय आपल्या धोरणावर ठाम राहणार आहे. बोर्डाचे सचिव सईकिया यांनी कोहलीच्या तक्रारीवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, ‘बीसीसीआय खेळाडूंच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कोणताही बदल करणार नाही. हे नियम संघाच्या व्यवस्थापन आणि खेळाडूंच्या भल्यासाठी तयार करण्यात आले आहेत.’

 

Recent Posts

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

4 minutes ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

17 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

33 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

1 hour ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago