ठाणे : राज्यात वाहन परवाना मिळविण्यासाठी किमान वय १८ वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच परवान्या शिवाय वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी काही नागरिक या कायद्याचा भंग करतात. परंतु पोलिसांच्या तपासणीदरम्यान परवाना नसलेले चालक आढळल्यावर मात्र त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. असाच प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे.
आनंदनगर परिसरातील रस्त्यावर कार चालवित असलेल्या एका अल्पवयीन मुलावर तसेच वाहन परवाना नसतानाही त्याला कार चालविण्यासाठी दिली म्हणून त्याच्या वडीलांवर ठाणे वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दहा हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. या कारवाईच्या निमित्ताने अल्पवयीन मुलाच्या हातात कारची चावी देणे वडीलांना महागात पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरांचा भाग येतो. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी ठाणे वाहतुक पोलिसांनी ठिकठिकाणी पथके तैनात केली होती. ही पथकाने श्वास विश्लेषक यंत्राद्वारे चालकांची तपासणी करीत होती. याशिवाय पोलिसांच्या पथकाने चौका-चौकात उभे राहून नेहमीप्रमाणे कारवाई करत होती.
यावेळी घोडबंदर येथील आनंदनगर भागातील अंतर्गत रस्त्यावर एक अल्पवयीन मुलगा कार चालवित असल्याची बाब वाहतूक पोलिसांच्या कासारवडवली शाखेतील पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्या मुलाला रोखले आणि त्याची चौकशी केली.
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…