Manmaad : मनमाडला कांदा साठवून ठेवलेल्या शेडला लागली आग

Share

आगीत शेकडो क्विंटल कांदा जळून खाक

नाशिक : मनमाड शहरातील चांदवड रोड लगत असलेल्या व्यापाऱ्याच्या कांदा शेडला आग लागून त्यात शेकडो क्विंटल कांदा जळून खाक झाला आहे. व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या नंतर कांदा शेड मध्ये साठवून ठेवला होता. आगीत कांद्यासोबत शेडपण जळून खाक झाल्यामुळे व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री कोणीतरी आग लावल्याचा संशय या व्यापाऱ्याने व्यक्त केला असून याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असुन अनेक ठिकाणी आग लागज्याच्या घटना समोर येत आहेत.

मनमाडला देखील चांदवड रोडवर व्यापाऱ्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला लाखो रुपयांचा साठवून ठेवलेल्या कांदा गोदामाला आग लागली असुन या आगीत लाखो रुपयांचा कांदा व कांदा शेड जळून खाक झाले आहे रात्रीच्या वेळी कोणी तरी आग लावल्याचा संशय व्यापाऱ्याने केला आहे. याबाबत मनमाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पूढील तपास पोलिस करत आहेत.

लाखो रुपयांचे नुकसान

सध्या कांद्याला जास्त भाव नसला तरी बाहेर देशात पाठवण्यात येणाऱ्या कांद्याला चांगला भाव आहे. यामुळे अनेक व्यापारी हे कांदा विकत घेऊन साठवून ठेवतात व त्यानंतर तो बाहेर देशात पाठवतात यासाठी अनेक व्यापारी कांदा चाळीत किंवा मोठ्या गोडावून मध्ये आपला साठा करून ठेवतात असेच साठवुन ठेवलेले कांदे जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

2 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

3 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

3 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

4 hours ago