नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेले काँग्रेस खासदार राहुल गांधी वारंवार व्हिएतनामला का जातात ? असा प्रश्न भाजपाकडून उपस्थित करण्यात आला आहे. राहुल गांधी २०२५ या वर्षात आतापर्यंत दोन वेळा व्हिएतनामला जाऊन आले आहेत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा मृत्यू (२६ डिसेंबर २०२४) झाला त्यावेळी राहुल गांधी व्हिएतनाममध्येच होते. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा मृत्यू झाला तरी त्यांना तातडीने मायदेशी परतावे असे वाटले नाही. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाही राहुल गांधी व्हिएतनामला गेल्याचे कानावर आले. आता पुन्हा राहुल गांधी व्हिएतनामला गेले आहेत. खासदार असूनही राहुल गांधी स्वतःच्या मतदारसंघात जाण्याऐवजी वारंवार व्हिएतनामला जात आहेत. राहुल गांधींना व्हिएतनामविषयी एवढे प्रेम का ? असा प्रश्न भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला आहे.
भाजपाने प्रश्न विचारताच काँग्रेसने सावध पवित्रा घेतला. जास्त माहिती देणे टाळत राहुल गांधी व्हिएतनामच्या आर्थिक प्रगतीचा अभ्यास करत आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत म्हणाले. व्हिएतनामने केलेल्या प्रयोगांपैकी काही प्रयोग भारतात शक्य आहेत का याचाही अंदाज राहुल गांधी घेत असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…