मुंबई : एकीकडे जगभरात होळीचे रंग विखुरलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी सनई चौघड्यांचा सूर दुमदुमणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar ) यांचे धाकटे चिरंजीव लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. जय पवारांच्या आत्याबाई आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule ) यांनी भाच्याचे आणि होणाऱ्या सुनेचे फोटो सोशल माध्यमांवर पोस्ट केले आहेत.
जय पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. जय पवार सक्रिय राजकारणात नसले, तरीही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकारणात त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता जय पवार लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव ऋतुजा पाटील आहे. लवकरच या दोघांची लग्नगाठ बांधण्यात येणार असून पवार कुटुंबात सनई चौघडे वाजू लागले आहेत. दरम्यान या लग्नाचे पडसाद राजकीय कारकिर्दीवर पडतील का ? हे पाहणे महत्त्वाचं ठरेल
सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील (rutuja patil) यांच्यासोबत अजित पवारांचे पुत्र जय यांचा विवाह होणार आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. आता त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी टूर्सच्या पाटील कुटुंबाची सून आहेत.
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…