जळगाव : पहाटे चारच्या सुमारास बोदवड जवळ मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात झाला. मालाने भरलेला ट्रक वेगाने आला. रेल्वेचे गेट तोडून ट्रक थेट रुळांवर आला. सुसाट रुळांवर आलेल्या ट्रकने भरधाव येणाऱ्या मुंबई-अमरावती एक्सप्रेसला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने मदतकार्य सुरू केले. अपघातात जीवितहानी झालेली नाही. रेल्वेच्या तंत्रज्ञांनी तातडीने कारवाई केली आणि सकाळी ७.५० पर्यंत रेल्वेची वाहतूक सुरळीत केली.
अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळावरुन पळून गेला. पोलीस ट्रकच्या चालकाचा शोध घेत आहेत. अपघातामुळे काही तास रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. मुंबई – हावडा मार्गावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व ट्रेनची वाहतूक मंदावली होती.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…