मुंबई : महिलांना सक्षमीकरण करण्यात व त्यांना त्यांचे कौशल्य आणि क्षमता दाखविण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात भारतीय रेल्वे आघाडीवर असते. रेल्वेमध्ये महिला शक्तीची भूमिका बहुआयामी आहे आणि कोणत्याही संस्थेच्या वाढीसाठी आणि यशासाठी ती महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे,पश्चिम रेल्वेच्या महिला तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी तिकीटविरहित प्रवासाला तोंड देण्यामध्ये लक्षणीय प्रगती दर्शविली आहे. सुरतच्या मुख्य तिकीट निरीक्षक नयना पटेल आणि दादरच्या उपमुख्य तिकीट निरीक्षक मल्लिगा हे अशा दोन महिला कर्मचारी आहेत. ज्यांनी या कामात अनुकरणीय कामगिरी दाखवली आहे.
दोघांनीही आपल्या विभागात तिकीट तपासणीत सर्वाधिक महसूल मिळवण्यात यश मिळवले आहे. मुख्य तिकीट निरीक्षक नयना पटेल यांनी अतुलनीय सेवा आणि कार्य दाखवले, मोठ्या उत्साहाने स्वतंत्रपणे काम करण्याची त्यांची दृढनिश्चय आणि क्षमता दाखवली.त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागाबाहेरील ४ हजार ४७०हून अधिक अनधिकृत प्रवासी शोधून तिकीट तपासणीतून सुमारे ३३ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…