होळीचा रंगीबेरंगी सण साजरा करणे सर्वांनाच आवडते. आपल्यातील अनेक जण स्वतःचे सौंदर्य, व्यक्तिमत्त्व खुलून दिसावे, म्हणून हेअऱकलर करताना नव्या ट्रेण्डमधील रंग निवडतात. होळी खेळताना केसांवर गुलाल उधळला जातो. केस रूक्ष होतात. हेअरकलर करतानाही केसांचे आरोग्य बिघडते. या दोन्ही गोष्टींचा केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. होळी साजरी केल्यानंतर तुमचे केस नेहमीपेक्षा जास्त रूक्ष आणि कोरडे झाल्याचे दिसून येते.
होळीत वापरल्या जाणा-या रंगांमध्ये ब-याचदा रसायने वापरली जातात. या रसायनांचा तुमच्या केसांशी संपर्क आल्यास नैसर्गिक तेल कमी होते, पण काळजी करू नका ! होळी साजरी करण्याची तयारी करताना केसांबाबत आवश्यक काळजी घेणे आवश्यक ठरते. होळीत केसांवर रंग लागल्यावर पुन्हा आवश्यक उपाययोजना केल्यास केसांचे आरोग्य आणि चमक टिकून राहते.
योग्य उपचार आणि सौम्य हेअरकेअर उत्पादने वापरून, तुम्ही केसांचा तजेलदारपणा परत आणू शकता आणि सणानंतरही तुमचे केस चमकदार ठेवू शकता. होळीच्या सणात सहभाग घेण्यापूर्वी केसांची काय काळजी घ्यावी, तसेच सण साजरा केल्यानंतर आवश्यक उपाययोजना आदींबाबत गोदरेज प्रोफेशनलच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर यियान्नी त्सापतोरी यांनी हेअरकेअर टिप्स शेअर केल्या आहेत.
होळी हा विविधरंगांनी नटलेला उत्सव आहे. होळीचा सण साजरा करण्यापूर्वी आवश्यक काळजीचा अवलंब करणे जरूरीचे आहे. होळीचा सण साजरा केल्यानंतर केसांची खासकरून काळजी घ्यायला हवी. केस स्वच्छ धुतले जातील, ओलावा आणि चमक टिकून राहील, याकरिता आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करावा. यियान्नी त्सापतोरी यांच्या टिप्स अंमलात आणल्यास होळीचा सण बिनधास्त साजरा करता येईल. तुमचे केस होळीत धम्माल केल्यानंतर कोणताही त्रास देणार नाही. आनंदाने रंगांची उधळण साजरी करा.
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…