मुंबई: भारताने रविवारी न्यूझीलंडला चार विकेटनी हरवत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारतीय संघाने आपला सातवा आयसीसीचा खिताब मिळवला आहे. या आठ संघांच्या स्पर्धेत भारताने आपला तिसरा विजय मिळवला. भारत दीर्घकाळापासून वर्ल्ड क्रिकेटच्या प्रमुख संघांपैकी एक आहे. ते सातत्याने या नॉकआऊट पर्यंत पोहोचत होते. भारतीय संघाने २००३ आणि २०२३ वनडे वर्ल्डकप, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९-२१ आणि २०२१-२३च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपर्यंत पोहोचले होते.
आयसीसीच्या एकूण खिताबांपैकी बोलायचे झाल्यास तर ऑस्ट्रेलिया सगळ्यात यशस्वी संघ आहे. त्यांनी सहावेळा वनडे वर्ल्डकप २००३, २००७, २०१५, २०२३ , एकदा टी-२० वर्ल्डकप २०२१, दोन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी(२००६, २००९) आणि एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप(२०२१-२३) जिंकला आहे. यासोबतच एकूण मिळून १० खिताब होतात.
१९८३ वनडे वर्ल्डकप – कपिल देवच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकली. वेस्ट इंडिजला हरवत त्यांनी नवा इतिहास रचला.
२००२ चॅम्पियन्स ट्रॉफी(श्रीलंकेसोबत संयुक्तपणे) – सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताने शानदार कामगिरी केली. मात्र सातत्याने पावसामुळे श्रीलंकेसोबत ट्रॉफी शेअर करावी लागली.
२००७ टी-२० वर्ल्डकप – महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला. त्यांनी फायनलमध्ये पाकिस्तानला हरवले.
२०११ वनडे वर्ल्डकप – धोनीच्या नेतृत्वात भारताने तब्बल २८ वर्षांनी श्रीलंकेला हरवत दुसरा वनडे वर्ल्डकप जिंकला.
२०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी – धोनीच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडला पाच धावांनी हरवत चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली.
२०२४ टी-२० वर्ल्डकप – विराट कोहली आणि रोहित शर्माच्या टी-२० करिअरमधीन अंतिम टप्प्यावर भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवत दुसरा टी-२० वर्ल्डकप जिंकला.
२०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी – भारतीय संघाने न्यूझीलंडला ४ विकेटनी हरवत सातवा आयसीसीचा खिताब मिळवला.
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…