रोहित शर्माने निवृत्तीबाबत पत्रकार परिषदेत केले मोठे विधान

Share

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या फायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला ४ विकेटनी हरवले. या विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या निवृत्तीबाबत मोठे विधान केले. तो म्हणाला की जसे सुरू आहे तसेच सुरू राहील.

कर्णधार रोहितने हे ही स्पष्ट केले की तो वनडे फॉरमॅट इतक्यात तरी सोडणार नाही. ३७ वर्षीय रोहितला सामन्यानंतर निवृत्तीबाबत विचारणा केली. यावेळेस तो म्हणाला, कोणताही फ्यूचर प्लान नाही. जसे सुरू आहे तसेच सुरू राहील. मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेत नाही आहे. कोणत्याही अफवा पसरवू नका.

हिटमॅन रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये ४१ बॉलमध्ये अर्धशतक झळकावले. सामन्यात रोहितने ८३ बॉलमध्ये ७६ धावा केल्या. त्याने या खेळीदरम्यान ३ षटकार आणि ७ चौकार ठोकले.

केएल राहुल आणि पांड्याचेही केले कौतुक

कर्णधार रोहित फायनलनंतर म्हणाला की, मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. येथील गर्दी शानदार होती. हे आमचे घरचे मैदान नाही मात्र तरीही आमचेच मैदान असल्यासारखे वाटत होते. येथे चाहत्यांची गर्दी मोठी होती. जेव्हा तुम्ही अशा पिचवर खेळत असता तेव्हा खूप जास्त अपेक्षा असतात. आम्ही त्यांची ताकद समजतो आणि याचा फायदा उचलतो.

रोहित पुढे म्हणाला, केएल राहुलचे डोके मजबूत आहे. तो कधीही आपल्या आसपास तणाव फिरकू देत नाही. याच कारणामुळे त्याला मधल्या फळीत ठेवायचे आहे. जेव्हा तो फलंदाजी करतो आणि स्थितीच्या हिशेबाने योग्य शॉट खेळतो तेव्हा तो हार्दिक पांड्यासारखा खेळाडूंना खुलेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य देतो.

Recent Posts

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

17 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

41 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

6 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

6 hours ago