मुंबईतील मरोळमध्ये वाहनांना आग, तीन गंभीर जखमी

Share

मुंबई : मुंबईतील मरोळ परिसरात गॅस पाईपलाईन गळतीमुळे आग लागली. ही आग लागल्यामुळे जवळच उभी असलेली वाहने जळून खाक झाली. यात एक कार, एक रिक्षा आणि एक दुचाकी यांचा समावेश आहे. दुर्घटनेत तीन नागरिक भाजले आहेत. भाजलेल्या तीन जणांवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. भाजलेल्यांमध्ये दोन २० ते २२ वयोगटातील तरुण आहेत आणि एक ५२ वर्षांचा रिक्षाचालक आहे. सर्वांची ओळख पटवण्यात आली आहे. संबंधितांच्या नातलगांना माहिती देण्यात आली आहे.

गॅस गळतीमुळे रविवारी ९ मार्च २०२५ रोजी मध्यरात्री आग लागली. ही आग अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने कारवाई करुन नियंत्रणात आणली आहे. यामुळे पुढील संकट टळले आहे. पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

दुर्घटना घडली त्यावेळी परिसरात जास्त वर्दळ नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

अरविंदकुमार कैथल – वय २१ – दुचाकीवर – ३० ते ४० टक्के भाजले
अमन हरिशंकर सरोज – वय २२ – दुचाकीवर – ४० ते ५० टक्के भाजले
सुरेश कैलास गुप्ता – वय ५२ – रिक्षा चालक – कंबरेखाली २० टक्के भाजले

Tags: firemumbai

Recent Posts

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

14 minutes ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

27 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

43 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

2 hours ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago