मुंबई: २००० या सालानंतर पहिल्यांदा भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी(ICC Champions Trophy 2025) स्पर्धेचा फायनल सामना रंगत आहे. दोन्ही संघादरम्यान ९ मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सामना रंगणार आहे. जेव्हा दोन्ही संघ शेवटचे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आमनेसामने आले होते तेव्हा टीम इंडियाला हरवत किवी संघाने खिताब जिंकला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५सेमीफायनलमध्ये(ICC Champions Trophy 2025) टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवत फायनलमध्ये जागा मिळवली. भारत आणि न्यूझीलंड एकाच ग्रुपमध्ये सामील होते. ग्रुप स्टेजमधील सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला ४४ धावांनी हरवले होते.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा(ICC Champions Trophy 2025) दुसरा हंगाम २०००मध्ये केनियामध्ये आयोजित करण्यात आला होता. यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवला होता. किवी संघ भारताला फायनलमध्ये हरवत चॅम्पियन बनले होते. येथे भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुली होता तर प्लेईंग ११मध्ये सचिन तेंडुलकर, युवराज सिंह, राहुल द्रविड, अजित आगरकर, अनिल कुंबळे, झहीर खान यासारखे खेळाडू होते.
तेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २६४ धावांचा स्कोर केला होता. कर्णधार गांगुलीने ११७ धावांची शानदार खेळी केली होती. सचिन तेंडुलकरने ६९ धावा केल्या होत्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी केली होती. दरम्यान, इतर फलंदाज चांगली खेळी करू शकले नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघातील क्रिस केर्न्सने १०२ धावा तडकावल्या होत्या. न्यूझीलंडने २ बॉल आणि ४ विकेट राखत आव्हान गाठले होते.
आता २५ वर्षांनी या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. त्यामुळे या फायनल सामन्यात भारतीय संघ किवी संघाला हरवत जेतेपद मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल. दरम्यान, यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताच्या कामगिरीवर नजर टाकल्यास न्यूझीलंडसमोर त्यांचे पारडे जड वाटते.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…