नवी दिल्ली : भारतीय रेल्वे सिग्नल आणि दूरसंचार अनुरक्षक संघाने (IRSTMU) आरोप केला आहे की रेल्वेमध्ये पदोन्नतीसोबत अनिवार्य स्थानांतरण केले जाते (Railway Employees promotion) आणि त्यात मोठ्या प्रमाणावर पक्षपात होत आहे. संघटनेने २७ फेब्रुवारीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांना पत्र लिहून सदर गैरप्रकार निदर्शनास आणला असून रिक्त पदांसाठी कर्मचाऱ्यांना त्यांची प्राथमिकता (railway promotion process) निवडण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.
IRSTMU चे महासचिव आलोक चंद्र प्रकाश यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, रेल्वेमध्ये पदोन्नतीसाठी स्पष्ट नियम असले तरी अनेक कर्मचारी पदोन्नती घेण्यास नकार देतात, कारण त्यांना दूरवरच्या किंवा नापसंतीच्या ठिकाणी स्थानांतरित केले जाईल याची भीती असते.
त्यांनी आरोप केला की, केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निकटवर्तीय असलेल्यांनाच इच्छित ठिकाणी नियुक्ती मिळते, तर उर्वरित कर्मचाऱ्यांना दूरच्या ठिकाणी पाठवले जाते. यामुळे त्यांचे कौटुंबिक जीवन विस्कळीत होते आणि अनेक वेळा उद्ध्वस्त होते.
संघटनेचे मत आहे की, या प्रकारच्या नियुक्त्यांमुळे कर्मचारी मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करतात, ज्यामुळे ते पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत आणि कामात अनास्था दाखवतात.
संघटनेने मंत्री वैष्णव यांच्याकडे मागणी केली की, पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना रिक्त पदांची माहिती देण्यात यावी आणि त्यांना स्वतःची प्राधान्यस्थाने सांगण्याची संधी द्यावी.
प्रकाश यांच्या मते, या निर्णयामुळे केवळ पदोन्नती आणि स्थानांतरण प्रक्रियेत पारदर्शकता येईल असे नाही, तर कामाची गुणवत्ता आणि कर्मचार्यांच्या कामावरील आदरातही वाढ होईल.
ते पुढे म्हणाले की, रेल्वेमंत्री रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत आहेत आणि आम्हाला आशा आहे की ते या मुद्द्याची सकारात्मक दृष्टीने दखल घेतील. तसेच, रेल्वे बोर्डातील वरिष्ठ अधिकारीही पदोन्नती आणि स्थानांतरण प्रक्रियेमध्ये असलेल्या पक्षपातावर गांभीर्याने विचार करतील, अशी अपेक्षा आहे.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…