नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी न्यायालयात हजर होऊन स्वतःची बाजू मांडावी. जामीन हवा असेल तर आधी स्वतःचे म्हणणे मांडा नंतर जामीन अर्जावर विचार करता येईल; असे नाशिकच्या कोर्टाने सुनावले. यामुळे काँग्रेसचे लोकसभा खासदार राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात हजर व्हावे लागणार आहे. नाशिकच्या कोर्टाने पुढील सुनावणी ९ मे रोजी ठेवली आहे. या सुनावणीवेळी राहुल यांना नाशिकच्या कोर्टात हजर व्हावे लागणार आहे.
राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली होती. राजकीय हेतूने काढलेल्या या यात्रेत वर्धा येथे राहुल यांची सभा झाली. या सभेत बोलताना राहुल यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी सावरकरप्रेमी देवेंद् भुतडा यांनी अॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत नाशिकच्या फौजदारी कोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर सुनावणी झाली त्यावेळी राहुल यांच्यावतीने जयंत जायभावे आणि आकाश छाजेड यांनी युक्तिवाद केला. सुनावणीवेळी राहुल यांच्यावतीने जामीन मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला. या अर्जावर विचार करत राहुल गांधी यांनी कोर्टात हजर होऊन स्वतःची बाजू मांडावी, असे निर्देश कोर्टाने दिले.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…