पुणे : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना उपयुक्त सुविधा निर्माण केली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून आयटीआयमध्ये डिजिटल लायब्ररी (Digital library) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेताना विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्य आणि वाचनाची आवड वृध्दिंगत होणे आवश्यक आहे. आधुनिक काळात डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक ग्रंथालयांबरोबरच डिजिटल लायब्ररीची गरज निर्माण झाली. डिजिटल लायब्ररी विद्यार्थ्यांना कधीही आणि कुठूनही ऑनलाइन शैक्षणिक साहित्य वाचण्याची सुविधा देते. डिजिटल लायब्ररीमुळे विद्यार्थ्यांना एकाचवेळी अनेक संसाधनांचा वापर करता येतो, माहितीचे अद्ययावतीकरण शक्य होते, जागेची बचत होते, पुस्तकांच्या देखभालीचा खर्च कमी होतो असे अनेक फायदे आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विद्यार्थ्यांना डिजिटल साहित्य उपलब्ध करून देणे शक्य आहे.
या पार्श्वभूमीवर आयटीआयमधील डिजिटल लायब्ररी (Digital library) सुविधेचा सर्व विद्यार्थ्यांना होणारा फायदा विचारात घेऊन सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये डिजिटल लायब्ररी सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. मुंबई, अमरावती येथील आयटीआयपासून सुरुवात योजनेअंतर्गत सुरुवातीला मुंबईतील नेताजी सुभाषचंद्र बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अमरावती येथील संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे डिजिटल लायब्ररी सुरू केल्या जाणार आहेत. त्यासाठी एकूण ९९ लाख ९६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…