मुंबई : महाराष्ट्र शासनाने अद्याप सन २०२४चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) घोषित केलेला नाही, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागविलेल्या माहितीच्या उत्तरातून स्पष्ट झाली आहे.
अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी नि. ज्ञा. धुमाळ यांनी सांगितले की, सन २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार २२ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदान करण्यात आला होता. तसेच, २०२४ च्या पुरस्कारासाठी २ जानेवारी २०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.
१९९७ पासून २०२३ या कालावधीत एकूण १९ महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. मात्र, सन २०२१, २०१३, २०१४, २०१६, २०१७, २०१८, २०१९ आणि २०२० या वर्षांत हा पुरस्कार देण्यात आलेला नाही.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, त्यामुळे शासनाने त्वरित २०२४ चा पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.
१९९७ साली पु. ल. देशपांडे (साहित्य), १९९८ साली लता मंगेशकर (संगीत), १९९९ साली सुनील गावसकर (क्रीडा), २००० साली डॉ. विजय भटकर (विज्ञान ), २००१ साली सचिन तेंडूलकर (क्रीडा), २००२ साली पं. भीमसेन जोशी (कला/संगीत ), २००३ साली डॉ. अभय बंग व राणी बंग (समाज प्रबोधन), २००४ साली बाबा आमटे (समाज प्रबोधन), २००५ साली डॉ. रघुनाथ माशेलकर (विज्ञान), २००६ साली रतन टाटा (उद्योग), २००७ साली रा. कृ. पाटील (समाजप्रबोधन), २००८ साली मंगेश पाडगावकर (साहित्य), २००८ साली नानासाहेब धर्माधिकारी (समाज प्रबोधन), २००९ साली सुलोचना लाटकर (मराठी चित्रपट), २०१० साली जयंत नारळीकर (विज्ञान), २०११ साली अनिल काकोडकर (विज्ञान), २०१५ साली बाबासाहेब पुरंदरे (साहित्य), २०२१ साली आशा भोसले (संगीत), २०२२ साली डॉ. दत्तात्रेय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी (समाज प्रबोधन), २०२३ साली अशोक सराफ (मराठी चित्रपट) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…