बदलापूर – नवी मुंबई बोगदा २०२६ पासून कार्यरत होणार

Share

बदलापूर : बदलापूर पूर्व ते नवी मुंबई हा बोगदा २०२६ पासून कार्यरत होणार आहे. या बोगद्यामुळे बदलापूर ते नवी मुंबई हा प्रवास फक्त २० मिनिटांत करता येईल. हा मार्ग बदलापूरमधील बेंडशील गावाला कल्याण तालुक्यातील रायतेशी जोडेल. यामुळे मुंबई, पालघर आणि पुढे गुजरातपर्यंत रस्ते मार्गाने वेगाने प्रवास करणे शक्य होणार आहे.

बोगद्यामुळे बदलापूरच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. रस्ते मार्गाने प्रवास वेगवान होणार असल्यामुळे बदलापूर आणि आसपासच्या परिसरात औद्योगिक क्षेत्राला तसेच गोदामांशी सेवांना चालना मिळण्याची शक्यता आहे. यातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळेल.

वडोदरा अर्थात बडोदा ते जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे. हा महामार्ग १२० मीटर रुंद आणि १८९ किलोमीटर लांबीचा, आठ लेनचा (मार्गिका) आहे आणि पूर्णत्वाच्या जवळ आहे. नवीन रस्त्यामुळे वडोदरा (बडोदा) आणि मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळ कमी होईल. वाहतुकीचा वेग वाढेल.

दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा लवकरच कार्यरत होणार असल्यामुळे नवी मुंबई आणि पनेवल पट्ट्यातील अर्थचक्राला गती येईल. या भागात उद्योगांना चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

Recent Posts

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

33 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

56 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

6 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

6 hours ago