मुंबई: पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले. बंगालच्या खाडीमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सीमोलॉजीच्या माहितीनुसार हा भूकंप सकाळी ६.१० वाजता आला होता.
सकाळी सकाळीच भूकंपाचे धक्के बसल्याने कोलकातामध्ये राहणारे लोक भयभीत झाले आणि घराबाहेर पडले. दरम्यान, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के कोलकाताशिवाय पश्चिम बंगालमधील दुसऱ्या शहरांनाही जाणवले.
नॅशनल सीस्मॉलॉजी सेंटरच्या माहितीनुसार २५ फेब्रुवारीला सकाळी ६.१० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्र बिंदू बंगालची खाडी ९१ किमी खोल होता.
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात रविवारी सकाळी ८.४२ वाजता मध्यम तीव्रतेचा भूकंप आला होता. मंडीच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. दरम्यान,यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवित अथवा वित्तहानी झाली नाही.
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…