Fight Against Obesity : पंतप्रधान मोदींची लठ्ठपणाविरोधात मोहीम, १० सेलिब्रेटींना केले आवाहन

Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लठ्ठपणाच्या विरोधात राष्ट्रव्यापी मोहीम सुरू केली आहे. नागरिकांनी वजन नियंत्रणात राखण्यासाठी पदार्थांमधील तेलाचा वापर मर्यादीत करावा. सध्या वापरता त्यापेक्षा १० टक्के कमी तेल वापरा. गरजेपुरतेच तेल पदार्थांसाठी वापरा. अती तेलकट खाणे टाळा आणि निरोगी राहा; असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जात प्रगती साधण्यासाठी आधी निरोगी राहणे आवश्यक आहे. निरोगी व्यक्ती प्रभावीरित्या प्रगतीच्या दिशेने प्रवास करू शकते तसेच या प्रगतीचे लाभ घेऊ शकते. या विचारातून पंतप्रधान मोदींनी लठ्ठपणाच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे.

लठ्ठपणाच्या विरोधात जनजागृती मोहीम सुरू करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्टद्वारे देशातील १० सेलिब्रेटींना टॅग करुन मोहिमेत सहभागी होण्याचे आणि जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्या १० जणांना त्यांच्या ओळखीतील प्रत्येकी १० जणांना टॅग करुन मोहिमेचा विस्तार करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी टॅग केलेल्यांमध्ये जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि महिंद्रा समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींनी कोणाला टॅग केले आहे ?

  1. महिंद्रा समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा
  2. गायक – अभिनेते निरहुआ हिंदुस्तानी
  3. ऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनू भाकर
  4. खेळाडू मीराबाई चानू
  5. अभिनेता मोहनलाल
  6. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलकेणी
  7. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला
  8. अभिनेता आर. माधवन
  9. गायिका श्रेया घोषाल
  10. पद्मभूषण पुरस्काराने गौरविलेल्या राज्यसभेतील खासदार सुधा मूर्ती

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

20 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

53 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago