ICC Champions Trophy 2025: पाकिस्तान, बांगलादेशचा पत्ता कट, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचले भारत आणि न्यूझीलंड

Share

दुबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या(ICC Champions Trophy 2025) सेमीफायनलमध्ये एंट्री घेतली आहे. सोबतच ग्रुप एमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱा दुसरा संघ न्यूझीलंड ठरला आहे. तर या ग्रुपमधील यजमान पाकिस्तान आणि बांगलादेशचा पत्ता मात्र कट झालाय.

ग्रुप ए मधून भारत आणि न्यूझीलंड हे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा निर्णय सोमवारी झाला. या दिवशी रावळपिंडीमध्ये न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांच्यात करो वा मरोचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने ५ विकेटनी विजय मिळवला.

भारत आणि न्यूझीलंडने जिंकले प्रत्येकी २ सामने

या निकालासह भारतीय संघ आणि न्यूझीलंडचे संघ फायनलमध्ये पोहोचण्याचा निर्णय झाला आहे. खरंतर, या दोन्ही संघांनी आतापर्यंत आपल्या ग्रुपमधील २-२ सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यात या संघांनी विजय मिळवला. दुसरीकडे पाकिस्तान आणि बांगलादेशचे संघ आहेत. या दोन्ही संघानी प्रत्येकी दोन सामने खेळले आणि दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारला.

या पद्धतीने पॉईंट्सच्या आधारावर पाकिस्तान आणि बांगलादेशचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर झाले आहेत. तर भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला ६ विकेटनी हरवले. यानंतर पाकिस्तानलाही ६ विकेटनी हरवले होते.

ग्रुप एमध्ये आणखी दोन सामने खेळवले जातील. हे सामने औपचारिक असतील. या ग्रुपमधील पुढील सामना पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील असेल. २७ फेब्रुवारीला हा सामना रंगेल. तर ग्रुपमधील शेवटचा सामना भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यात असेल.

Recent Posts

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

13 minutes ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

24 minutes ago

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

3 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

3 hours ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

3 hours ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

3 hours ago