साहित्यविश्वात अनेक साहित्यकृती निर्माण होतात आणि वाचकवर्ग त्यांचे उत्साहात स्वागत करतात. काही साहित्यकृती तर ‘माईलस्टोन’ ठरतात. अनेकदा अशा गाजलेल्या साहित्यकृतींचे माध्यमांतरही होताना दिसते. आतापर्यंत विविध कथा, कादंबऱ्या या रंगभूमीवर; तसेच छोट्या व मोठ्या पडद्यावर माध्यमांतर होऊन अवतरल्या आहेत. रसिकही त्यांच्या आवडीच्या अशा साहित्यकृतींच्या माध्यमांतराचे स्वागत करत आले असून, या कलाकृतींना रंगभूमीवर किंवा पडद्यावर अनुभवणे ही रसिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरलेली आहे. सध्या सर्वत्र एका मराठी साहित्यकृतीची मोठी चर्चा आहे आणि ती साहित्यकृती म्हणजे ज्येष्ठ साहित्यकार शिवाजी सावंत यांची ‘छावा’ ही कादंबरी…! सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या सगळ्याचा एक वेगळा परिणामही होताना दिसत आहे आणि तो म्हणजे ‘छावा’ या कादंबरीला आता वाचकांकडून खूप मागणी वाढली आहे.
अनेक पुस्तकांच्या दुकानांमध्ये ‘छावा’ ही कादंबरी विकत घेण्यासाठी वाचकवर्ग पायधूळ झाडताना आढळत आहे. काही ठिकाणी तर ही कादंबरी दुकानातून गायब झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी सद्यस्थितीत ही कादंबरी हमखास उपलब्ध होण्याचे ठिकाण म्हणजे विविध वाचनालये…! ‘छावा’ ही कादंबरी ऐंशीच्या दशकात जेव्हा प्रकाशित झाली, तेव्हापासूनच वाचकांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. कालांतराने या कादंबरीच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या. ही कादंबरी ‘माईलस्टोन’ साहित्यकृती असल्याने बहुतेक सर्वच वाचनालयांत ती उपलब्ध आहे. सध्या ‘छावा’ या कादंबरीसाठी वाचकांकडून वाचनालयांकडे मोठी मागणी होताना दिसत आहे. अर्थातच, मागणी अधिक आणि पुरवठा कमी, या स्थितीमुळे वाचकांना ही कादंबरी आता हातात मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. एखाद्या साहित्यकृतीवर नव्याने निर्माण झालेल्या कलाकृतीमुळे, मूळ साहित्यकृतीवर कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो, याचे उदाहरण सध्या ‘छावा’ या चित्रपटाच्या निमित्ताने स्पष्ट होत आहे. या संदर्भात माहीम सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल संदीप पेडणेकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणतात, ‘आमच्या वाचनालयात शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीच्या प्रती अर्थातच आहेत आणि ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या कादंबरीला युवा पिढीकडून मागणी वाढली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाची व पराक्रमाची उजळणी पुन्हा एकदा युवा पिढी यानिमित्ताने करत आहे आणि हे आपल्या इतिहासाचे वैभव आहे. अशा चित्रपटामुळे वाचनाची ओढ वाढली, हे वाचनसंस्कृती जपणाऱ्या आमच्यासारख्या वाचनालयासाठी महत्त्वाचे आहे’.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…